Friday, March 30, 2012

थेंबातलं आभाळ

प्रविण दवणे यांच 'थेंबातलं आभाळ' हे पुस्तक वाचनात आल.
प्रविण दवणे यांनी सकाळ पेपरसाठी लिहिलेल्या लेखांचे संग्रहण या पुस्तकामधे केले आहे.
हे लेख म्हणजे दैनंदिन आयुष्यामधे अनुभवलेले प्रसंग. काही हलके-फुलके, विनोदी तर काही अगदी मनाला भिडणारे, विचार करायला लावणारे!
वाचता-वाचता जाणवते की आपल्यालाही असे अनुभव येत रहातात पण कदचित आपण तितक्या संवेदनक्षमतेने त्यांच्याकडे पहात नाही.
हे पुस्तक वाचताना आपण काही मोठ तत्वज्ञान वाचतोय किंवा हे वाचल्याने मनावर ताण आलाय असं वाटत नाही. पण तरीहि या लेखांमधून लेखकाला जे सांगायचय ते नेमकेपणानं उमगतं.
पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच्या या ओळी विशेष लक्षात रहातात -

" स्पर्धेच्या धावपळीत तणावाचं ओझं
नव्या जगाचं सूत्र एकच -
मी - माझ्यापुरता - माझं..
अशावेळी कळत नाही - जगावं कसं?
आनंदाचा मेकअप् करीत,
हसावं तरी कसं?
अशा रितेपणात कुणी, ह्रदय भरुन येतं...
मोगरयाच्या कळ्यांनी, ओंजळ भरुन जातं!
हात त्याचे हाती घेता,
जगण कळून जातं...
थेंबामधलं आभाळ मग..
हळूच उजळून येतं!"

Saturday, May 29, 2010

White Tiger - Aravind Adiga

White Tiger - a life-story of an Indian, Balram Halwai, narrated to President of China, Mr. Jiabao.
Mr. Jiabao is about to have an official visit to India. Balram feels that the politians will fool Mr. Jiabao by creating false picture about life in India. That's why he decides to inform Mr. Jiabao what actually is life in India by telling him his own story.
He writes seven letters to Mr. Jiabao. In his letters he writes about life in rural India. How people in rural India are being dominated by landlords, how the dowry system is followed there. He sketches the pictures of corruption and bribery spreading in India, exploitation of servants by their masters.
An inspector who visits Balram's school finds that Balram is the only student who can read & write well compared to other students. He then calls Balram as a White Tiger and offers him a scholarship.But Balram couldn't complete his education due to poor family background.
Balram doesn't want to work like his father did - carrying goods, he doesn't want to work at Tea-shop like his cousin. He decides to learn driving. He invests money and learns driving.
Balram is serving as a driver to one of the landlord's family.
He moves to Delhi with his master. Now here, his job is not just to drive his master but also to cook,clean & do whatever else his master asks him to do. In Delhi his master deals with politicians & bribes them in order to ensure the survival of his family business. Balram is just a dumb witness to all the activities of his master.
Balram, though working as a driver, desires to have his own business. He throbs his master and runs away with all his money. He moves to Banglore. Police unable to catch him up.
He starts his business in Banglore,providing cabs/cars to call centres. Here he explains the modern life-style in Banglore city to Mr. Jiabao. He has few more plans to expand his buisness. He calls himself a successful buisnessman. Through all his journey to become a buisnessman, whatever tricks/techniques he has used, he doesn't feel guilty. He ignores them easily as he has experienced that this is how is the lifestyle followed here. And this is the way to survive.
What he has seen during his journey of life is landlord exploiting poor, corruption and bribery in every field, masters exploiting their servants.... all these facts have penetrated through all levels of society. So there is no big deal if he has chosen his own way to become successful, to become part of this society.

Following are the paras stating the trustworthiness of servants in India :

"Mr. Jiabao
Sir.
When you get here, you'll be told we Indians invented everything from the internet to hard-boiled eggs to spaceship before the British stole it all from us.
Nonsense. The greatest thing to come out of this country in ten thousand years of its history is the Rooster Coop.
Go to Old Delhi behind Jama Masjid, and look at the way they keep chickens there in the market. Hundreds of pale hens and brightly colored roosters, stuffed tightly into wire-mesh cages, packed as tightly as worms in a belly, pecking each other and shitting on each other, jostling just for breathing space; the whole cage giving off a horrible stench - a stench of terrified, feathered flesh. On the wooden desk above this cop sits a grinning young butcher, showing off the flesh and organs of recently chopped-up chickens, still oleaginous with a coating of dark blood. The roosters in the coop smell the blood from above. They see the organs of their brothers lying around them. They know they're next. Yet they do not rebel. They do not try to get out of the coop.
The very same thing is done with human beings in this country."


"The Rooster Coop doesn't always work with minuscule sums of money. Don't test your chauffeur with a rupee coin or two - he may well steal that much. But leave a million dollars in front of a servant and he won't touch a penny. Try it: leave a black bag with a million dollars in a Mumbai taxi. The taxi driver will call police and return the money by the day's end. I guarantee it.(Whether the police will give it to you or not is another story, sir!) Masters trust their servants with diamonds in this country! It's true. Every evening on the train out of Surat, where they run the world's biggest diamond-cutting and polishing business, the servants of diamond merchants are carrying suitcases full of cut diamonds that they have to give to someone in Mumbai. Why doesn't that servant take the suitcase full of diamonds? He's not Gandhi, he's human, he's you and me. But he's in the Rooster Coop. The trustworthiness of servants is the basis of the entire Indian Economy."


Friday, November 20, 2009

सिंहासन - अरुण साधू


ही कादंबरी आपल्यासमोर राजकीय घडामोडींचे वास्तव चित्रण मांडते. या कादंबरीची प्रथम आवृत्ती आहे १९७७ ची. म्हणजे साधारण राजकारणामधे घडणारया गोष्टी या तेव्हाही काही वेगळ्या नव्ह्त्याच! एखाद्या मंत्र्याने अचानक आपला राजीनामा दिला की राजकीय वर्तुळामधे वादळ उठते. पण या वादळाची चाहूल या वर्तुळाच्या परीघामधे आधीच येऊन पोचलेली असते. राजीनामा देण्याआधीच अफवांचे पेव फुटलेले असतात. अशाच एका प्रसंगाचे वर्णन खाली दिलेल्या परिच्छेदामधे केले आहे.
या प्रसंगाचे आकलन होण्यासाठी काही पात्रांच परिचय आवश्यक आहे.
दिगू टिपणीस - वार्ताहर
विश्वासराव दाभाडे - अर्थमंत्री
'विश्वासराव दाभाड्यांना आपली हालचाल कितीही गुप्त ठेवायची असली, तरी एव्हाना अशा बाबतीत बातम्यांचे आणि कंड्यांचे जे चक्र फिरत असते, त्यान वेगही घेतला होता. टेलिफोन्स बिझी राहू लागले होते. नागपूर, मुंबई, औरंगाबाद, रत्नागिरी, नासिक, अमरावती, पुणे आणि अशा कितीतरी गावांमधे आणि परस्परांत ट्रंककॉल्सची वर्दळ सुरु झाली होती. खासदार, मंत्रिपदाचे इच्छुक आमदार, दबावगटांचे नेते, खुद्द मंत्री, त्यांची घरं, त्यांचे सल्लागार आणि हितचिंतक यांच्यात गडबड उडून गेली होती. विरोधी नेत्यांमधेही कुणकुण सुरु झाली होती.
बातम्यांची वर्तुळावर वर्तुळे निर्माण होऊ लागली होती. पण ती या एका मर्यादित विश्वात. सत्तेशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे किंवा दूरान्वयानेही जे सत्तास्थानाशी नाते सांगू इच्छितात किंवा सत्तापदांची वेडी स्वप्ने बघत असतात, अशा लोकांच्या, सामान्य जीवनाच्या विशुद्ध प्रवाहापासून दूर फुटलेल्या या वेगळ्या जगात. बाहेरच्या विश्वाला अद्याप याची कल्पना आलेली नसते. आत काहीतरी खळबळ चालू आहे, याची नुसती एक ओझरती जाणीव असतेच, नाही अस नाही. दिगू टिपणीससारखा एखादा बुडबुडा आतला दुर्गंधी वायू बरोबर घेऊन वर फुटत असतो, पण तो अपवादात्मक. अद्याप ही खळबळ आतच आहे आणि ती वर उफाळून येईल, तेव्हा गडबड उडालेली असेल.
सी.एम् जागे झालेले असतात. विधानसभेतील आणि पक्षातील आतल्या गटांची यादी पुन्हा पुन्हा उजळून पहात असतात. गटागटांना हळूच फोनवरुन निरोप जायला सुरुवात होते. हे सर्व सी.एम् नाच करावे लागते असे नव्हे. सी.एम् साठी काम करायला अनेक माणस खुशीन तयार असतात. अर्थमंत्र्यांच्या गटाची तयारी तर आधीच झालेली असते. आता फक्त 'फायर' अशी आज्ञा होण्याची वाट असते.
पक्षाध्यक्ष नेहमीप्रमाणेच गाफील पकडले गेलेले असतात आणि या क्षणापर्यंत आपल्याला हे प्रकरण या थराला आलेले आहे, याची माहिती नसावी, या कल्पनेनं रागाने जळफळत असतात. आपण केलेल्या फोनला सी.एम् च्या आणि अर्थमंत्र्यांच्या बंगल्यामधून चक्क 'साहेब नाहीत' अशी स्टॉक उत्तरं मिळताहेत, हे पाहून अपमानाने तडफडत असतात. पण त्यांचा इलाज नाही. पक्षातलं हे वादंग मिटवायलाच पाहिजे, म्हणून त्यांनी आत अखिल भारतीय पक्षाच्या अध्यक्षाला दिल्लीला कॉल लावलेला असतो. वेळप्रसंग पडल्यास थेट पी.एम् नाही फोन करण्याची ते तयारी ठेवून आहेत.
मंत्रिमंडळाचे इतर सदस्य खुशीत आहेत. त्यांचेही आपापल्या गटांचे मोर्चे बांधणे केव्हाच सुरु झालेले आहे. या लढतीमधे होता होईल तेवढे आपले हात धुऊन घ्यायचे आणि आपली घोडी शक्य तेवढी पुढे सरकवायची त्यांची तयारी आहे. ते याच संधीची आजवर वाट पाहात आले आहेत. आता राजकीय आणीबाणीचे शिंग फुंकले जात आहे. मागे राहून चालणार नाही. विधानसभेतील महत्त्वकांक्षी आणि ताकदवान आमदारही आता रणात उतरतील. मंत्रिमंडळावर निदान राज्यमंत्री म्हणून किंवा फारतर विधानमंडळ पक्षाच्या एखाद्या पदावर तरी जागा मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होतील. ज्यांच्या फारशा महत्त्वकांक्षा नाहीत, असे आमदार आणखी एखाद्या कुठल्यातरी कमिटीवर वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न करतील. काहींना लायसन्सेस हवी आहेत. काहींना स्वतःसाठी, काहींना दुसरयासाठी. कुणाचा मोटारींच्या प्रायॉरिटीमध्ये अद्याप नंबर लागलेला नाही, तो लावून घ्यायचा आहे. कुणाला मुंबईत फ्लॅट मिळवायचा आहे, मिळवून द्यायचा आहे, कुणाला जायकवाडीच्या क्षेत्राखालची जागा विकत घ्यायची आहे, कुणाला पेंचचं पाणी आपल्या शेताशेजारुन न्यायच आहे, तर कुणाला राष्ट्रीय हमरस्ता आपल्या मतदारसंघातून न्यायचा आहे. कुणाला साखर कारखान्याच्या पुढच्या निवडणूकीसाठी उभं रहायच आहे, तर कुणाला जिल्हापरिषदेच अध्यक्षपद हव आहे. कुणाला दारु दुकानाचा परवाना हवा आहे, तर कुणाला स्पिरीटची डिस्ट्रिब्युशन एजन्सी. अशा इतर अनेक गोष्टी. नेहमीच या चालू असतात. पण आता त्यांना जोर येईल कारण अशा रजकीय रणाधुमाळीच्या काळात प्रसादाचे वाटप मुकहस्तानं होत असत.अशा काळात नुसत्या आश्वासनांनादेखील महत्त्व असत आणि मटक्याच्या व्यवहारात सगळं काम जसं तोंडी बोलून चालतं आणि त्यावर विश्वास ठेवला जातो, तशीच अशा काळात तोंडी झालेली देवाण-घेवाण प्रामाणिकपणे पाळली जाते, असा सगळ्यांचा विश्वास असतो. नाही पाळली गेली, तर त्याचे परिणाम काय होतील, याची प्रत्येकाला कल्पना असते. तेव्हा ही सुवर्णसंधी आता कुणी सोडणार नाही. सर्व आमदार, खासदार, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री या लढतीत मोठ्या हौसेन भाग घेतील. सार्वत्रिक निवडणुकांना अजून दोन वर्ष अवधी आहे. त्याच्या आधी अशी पर्वणी क्वचितच येते. आली आहे तोवर हात धुऊन घ्यायचे.
हे वर्तुळ अद्याप वाढलेलं नाही. वर्तुळाच्या कक्षा जेव्हा वाढत जातील, तेव्हा इतर अनेक लोक त्यात ओढले जातील.विरोधी पक्षातील इच्छुक, आमदार, व्यापारी, कारखानदार, वेळ प्रसंग पडला तर सरकारी अधिकारी आणि पोलिसदेखील. जमिनदार तर आहेतच. बाजूला रहातील फक्त लोक. त्यांना या रणधुमाळीचा उपसर्ग पोचणार नाही असं नाही. पण त्याला जनतेचा इलाज नाही. कारण निवडणूकांना अद्याप दोन वर्ष अवधी आहे. तोवर लोकांना काहीच करता येणार नाही. पण हे वर्तुळ वाढणार नाही असही नाही. हळूहळू वाढेल. आता तर कुठे वलयं निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे.

Wednesday, August 19, 2009

व.पु. ...

खरंतर एखाद्या पुस्ताकविषयीच लिहायचं होतं पण नाही जमलं
पण मग अपर्णाचा post पाहिला आणि वाटलं आपणपण व.पु.न्च्या ओळी तरी post कराव्यात :)
बघा पटतंय का...

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."


"मैत्रितली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातुनच तयार होते आणि दुधावरच छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्ह. सायीखालच्या दूधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. आपल्याला लहानपणचे आठवते त्या आधीपासून आपण मैत्रित पडलेले असतो"

"नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्‍या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त."

"जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही."


"काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी..स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल."

"स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते."

"आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही.
आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.
माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...!!!"


"उथळ विचारांची माणसं देवावर आणि दैवावर विश्वास ठेवतात,
शहानी आणि समर्थ माणसं कार्यकारणभावावर विश्वास ठेवतात..
अस्थिर माणसं जशी बारमधे सापडतात तशी सिधदिविनायकाच्या रांगेतही..
अर्थहीन श्रध्दा ही व्यसनासारखीच... "

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत"

"पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर....."

"प्रेम म्हणजे ताजमहाल आहे.डोळे निवतील,
मनाला बरं वाटेल,ईतपतच खरं आहे.बांधण्याचा प्रयत्न करु नये."

"आयुष्यात एक क्षण भाळण्याचा ,उरलेले सगळे सांभाळण्याचे."

"सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय ?
फक्त आठ्वानिंच्या राज्यात तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात.
त्या दुखाच्या असोत वा आनंदाच्या. दुखाच्या असतील तर त्या पाई वाया गेलेला भूतकाल आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण गेले, म्हणुन त्रास"

"आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, अपेक्षेचे हुन्द्के, दुक्खाचे कढ आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहित असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मलुन् जनाच्या क्षणी असावा या सारखी इच्छा पूरी न होने ह्यासरखा शाप नाही. पण साक्षीदार मिलुन त्याला त्यातली उत्कटता न कलने ह्यासरखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपनाचा शाप बरा.."

"पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...
बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ??"

"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.....पण गगन्भरारीच वेड रक्तातच असाव लागत..कारण आकाशाची ओढ दत्त्क घेता येत नाही"

"सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!"

"प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही.
कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच
पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत.
मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच"

"प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापनाइतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, काहींची नंतर!"


"पारिजातकाचं आयूष्य लाभलं तरी चालेल. पण लयलुट करायची ती सुगंधाचीच !"

"समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते. त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्‍या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये."

"वियोग झाल्यावर माणुस का रडतो?
-ते फक्त वियोगाचं दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात,
त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणिवेचं दुःखही त्यात असतं."

"तंञावर फ़क्त यंञच जिंकता येतात. मनं जिंकण्यासाठी मंञ सापडावा लागतो."

"स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळ मान्य करावसा वाटत नाही तेव्हा डोळ्यांतुन येणार पाणी पापणीच्या आत जिरवायचं असत."

"माणुस जेवढा जवळचा,तेवढा बाण जास्त जहरी......."

"म्रुत्युवर कोणाला विजय मिळवता येत नाही.त्याचं कारण तो वेळ सा.भाळतो वर्तमान्लाळ जपतो मागच्य पुढच्या क्ष्शणाचं तो देणं लागत नाही."

"सुख कधी मागुन मिळत नाही तर ते दुसर्याल दिल्याने मिळते"

"चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!"

"सावली देऊ शकणार्‍या वट वृक्षान विश्रांतीला आलेल्या पाथस्थाला बाकीची झाड सोडून तुला नेमका मीच सापडलो का? अस विचारायच नसत.............."

"वर्धक्यात दात,नजर,केस,कान एकेक निकामी होत त्याला आमचे काका म्हणतात
नियती तुमच्याकडून दीर्घायुष्य लाभाल्याबद्दल सर्व्हाइवल टॅक्स वसूल करते..................."

"जगात पुरुषार्थ ह्या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फार, म्हणजे फारच मोजके आहेत.
पुरुषार्थ म्हणजेजे रसिकता.
जबरदस्ती नव्हे, शारिरिक ताकद नव्हे, तर मानसिक ताकद.
ज्याला हि मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला.
असा पुरुष, पुरुष असला तरी कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करत नाही."

"कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच."

आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे."

"मखमलीचा अंगरखा घातला की पहाणाऱ्याचे डोळे दिपतात. पण तो अंगरखा घालणाऱ्याला आतलं अस्तरच स्पर्श करीत असतं. तशा काही व्यथा."

"आपण ईथून आता सात पवल चालू.आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावालागनिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मारताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध गेतलेला नाही.मी श्रधावन्त मात्र जरूर आहे.सौदर्य,संगीत,सुगंध,साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो.पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो.मला परमेश्वर व्हायच नाही.नवर्‍याला देव वगैरे मानणार्‍यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विच्रलेले नाही. तशी नसशीलच तर उत्तम, पण असलीच तर ईतकच सांगेन की मला देव मानण्याचा प्रयत्‍न केलास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत-नकळत होणारे अपराध क्ष्यम्य ठरतील. कुणाचही मन न दुखावण हिच मी देवपूजा मानतो. जीवात-जीव आसेतो मी तुला सांभाळीन सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा ईतकच सांगेन की आपल्या घरात,संसारात तु चिंतेत असताना मी मजेत आहे अस कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायाच म्हणजे मला पत्त्नि हवीच होती,मात्र पत्त्नि झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ.
मला सखी हवी आहे ..........होशील !!!.........."


"प्रत्येक वेळेला रडणार्याच सान्तवन करता येतच अस नाही, अर्थात रडणार्याला त्याची जाणीव नसते.
केव्हाही डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी अस तिला वाटत.
पण काही वेळेला रडणार्या माणसापेक्षा सान्तव्न करणार्‍या माणसावरच जास्त ताण पडतो.
ज्योतीपेक्षा समई जास्त तापात नाही का?"

"मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात.
तुट्ले तर श्वासानेही तुट्तील, नाहीतर वज्राघातानेही तुटनार नाहीत."

"कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे.....
म्हणूनच खडक झिजतात
प्रहाव रुंदावत जातो."

"ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"

"व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'."

There is no single example of Happy Philosopher. So Dont be philosopher.

"रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं."

कन्या पतीच्या घरी निघाली तेव्हा व. पु. काळे लिहीतातः

"तु पतीच्या घरी निघालीस! होय जायलाच हवं. 'पिता' आणि 'पती' एक रेघ आणि एक वेलांटि इकडची तिकडं, तरीही वाटतं, पती होणर्‍या प्रत्येक पुरुषाला पिता होणं जमेल का? कन्यादान करतांना प्रत्येक पिता मुकं का होत असावा? कदचित तो जवायाला सांगु शकतं नसेल की, बाबा रे , मझ्या मुलीचा तु पतीच आहेस, तरीही संसारात तिचा पित्यासारखा साभाळ करशील का?"

"जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की.."

"काही स्पर्ष शेवटच्या श्वासापर्यत साथ करतात."

"प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते;जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.म्हणुन्च आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असत."

"निसर्गाचा,सौंदर्याचा,मोठेपणाचा कशाचाही हा साक्षात्कार झाला की हात जुळतात."

Thursday, August 13, 2009

स्वामी

स्वामी कादंबरीमधले माझे काही आवडते परिच्छेद ....

" रमा ज्या मार्गाने तू जातेस, तो तू डोळे भरून बघ. वाटेने तुला सागराचं दर्शन होईल. किनारयाकड़े सारखा झेपावणारा तो सागर बघ. प्रत्येक ठिकाणचा सागर तुला वेगळा भासेल. प्रत्येक ठिकाणचा किनारा बारकाइने पाहिलास, तर वेगळा आवाज देईल. काही ठिकाणी सागराचा प्रमत्तपणा तुला दिसेल, काही ठिकाणी त्याच्या आवाजात व्यथा व्यक्त होईल. भरतीला पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी गर्जत येणारा सागर, जेव्हा ओहोटी सुरु होते तेव्हा व्याकुळ होउन मागं जाताना दिसेल. काठावरच्या नारळी-पोफळीच्या बागा सागराला हसताना दिसतील. तो पराजय मोठा विदारक आहे; क्लेशदायक आहे. हाताशी आलेल्या धरतीचा स्वीकार करता येऊ नये, हा त्या प्रियकर सागराचा पराभव अनुकंपेने बघ. नित्याचा तो पराभव तो सहन करतो आहे. तरीही प्रेमाची उत्कटता एवढीही कमी होत नाही."


" रमा पौर्णिमेच्या रात्रीनं बेभान होणाऱ्या फारच थोड्या माणसांना अमाव्स्येच्या रात्रीचं सौंदर्य पाहता येतं. ज्यांना ही दृष्टी लाभली, त्यांना सुखदुःखांचं भय उरत नाही. दोन्ही प्रसंगात देखील सौंदर्य टिपण्याची त्यांची तयारी झालेली असते.पहाटे सूर्यबिंब जेव्हा क्षितिजावर येतं, तेव्हा त्याच्या तेजानं आकाश झळाळत असतं. सूर्य जन्माचं ते प्रतीक असतं; पण सायंकाळी तोच सूर्य अस्ताला जात असता साऱ्या आकाशात रंगांची बरसात दिसून येते. सारा दिवस आपल्या तेजानं पृथ्वीला न्हाऊ-माखू घालून जीवन कृतार्थ झालेलं असतं. त्यांचं समाधान त्या रंगांनी प्रकटतं. असं समाधान किती जणांचं असेल ?”


" ख़बरदार ! राज्य नको बगावत हवी ! जबाबदारी नको, बेशिस्त हवी. तीन वेळा पेशवेपद पायी टाकलं, ते लाथाडलंत. नाही काका, आता मला ते सहन करण्याची ताकद नाही, सारया आयुष्यभर काकांचे लाड पुरे करण्याखेरीज मला दुसरं काही कामच नाही का ? “ तुमच्या जागी दुसरा कुणी असता, तर ...” काय केलं असतं ? मला विचारता काका ? कुठून आणलंत हे बळ काका ? काय केलं असतं, ऐका ! दुसरं कुणी असतं, तर हत्त्तीच्या पायी दिलं असतं ... मेखसून मस्तक छिनलं असतं ... तुमच्या जागी माझा मुलगा असता, तरी हेच केलं असतं ....”


"रमा मृत्यू अटळ आहे, जे जे दिसतं ते एक ना एक दिवस नाहीसं होणार, मग ते आज असो अथवा कैक वर्षानी होवो. जीवन व मृत्युचं भय बाळगणारयाला केव्हाही समृध्द जीवन जगता येणार नाही. रमा,जीवन किती वर्ष जगला, त्याला फारसा अर्थ नाही. जीवन कसा जगला, ह्याला महत्त्व आहे. नाही तर चंदनाचं नावही राहिलं नसतं. सारयानी वटवृक्षांचं कौतुक केलं असतं. जो आनंद चंदनाच्या माथी लिहिला आहे, तोच आनंद मी उपभोगतो आहे. खरचं रमा, मी समाधानी आहे. सुखी आहे. तृप्त आहे. दारी आलेल्या मृत्यूचं स्वागत करायला मी तयार आहे, त्यांचं भय मला वाटत नाही ...


Sunday, July 26, 2009

Annapurna


In 1950 Maurice Herzog lead a team of French mountaineers to climb the 26,250 ft peak Annapurna in Nepal. It was the first team in the history of mankind to scale a 8000 m peak. Also, the team completed the expedition without any oxygen supply. What makes this expedition more thrilling is, that it was carried out with sketchy
and inadequate maps. The team didn't even know the exact location of the peak. It sounds adventurous, but at the same time really scary to me and the team had their share of both during the expedition.

The book starts with a brief introduction of each of the team members of the expedition. If I am right, there were around six climbers in the team and they were the best in France. One of the climber was also a doctor. As you read further, you will realize that he played a very important role in the success of the expedition.
Most of the climbers had been on several expeditions in Alps and other European mountain ranges. So with a team of finest climbers, Maurice departs France to scale a 8000 meter peak in the Himalayas.

The journery to Nepal, is via India. The team lands in some airport in India and is supposed to take a flight to Nepal. But, the customs find out that the team is violating some regulations with respect to the amount of luggage permitted in the aircraft. Here Maurice makes a comment which goes something like "...in India all problems can be solved if you can deal properly..." It seems that the French team bribed the Indian authorities or used some influence to board the aircraft with their extra luggage. Anyway...things were not much different even half a century back :)

In Nepal, the team gets the desired permit and is accompanied by one of the King's officer, who will help them in getting porters and will also take care of other needs of the team. As the team hikes through different villages of Nepal, Maurice does a very good job of providing minute details of the village and the people around. If you have ever been to any of the villages in North Eastern states, you can relate to the narration very well.

After few days of hiking the climbers reach a place where they decide to camp for the next few days and finalize the route to the peak. Initially I think the team had planned to climb Dhaulagiri - another peak next to Annapurna. In a team of two, the climbers explore the region and create a topographical map for their reference. After days of exploration and careful analysis, the team concludes that Dhaulagiri is not a feasible peak to climb. Now, its destination Annapurna. At this point of time, you can see slight differences developing between Maurice and other climbers. Maurice believes in spending more time knowing the topography and understanding the routes, whereas others were eager to start the actual climb to the peak.

The team finalizes the route to Annapurna. There would be five camps en route the peak. Soon the base camp is established, and movement of each group along with the sherpas is planned, to ensure that everyone has enough strength and resources to finish the expedition. The team had lost a lot of time and monsoon was real close. Once it starts raining the climb would be impossible. Every single day was important. Two climbers along with some sherpas set out for the next camp. Three teams take turns in climbing and establishing the camp.

One by one, all the camps are established. Maurice and Lachenal are all set to make the final assault to the summit. Monsoon had already arrived in India and there might be storms any moment at Annapurna. After struggling through the climb, Maurice and Lachenal make it to the summit. Annapurna is conquered. Maurice is overwhelmed at the accomplishment and takes some pictures. Lachenal is equally happy but wants to go back to the camp as soon as possible. He fears that his feet has got frostbite. So when Maurice is still taking pictures, Lachenal rushes down. Soon Maurice follows him. Suddenly Maurice gets the shock of his life. One of his gloves is missing. He lost it at the peak. The weather was getting worse and there was no question of going back to get the gloves. Maurice knows what it means to expose your hand at this altitude, he will get frostbite for sure and thus risk his fingers.

Soon Maurice and Lachenal reach Camp 5 where they meet two other climbers from their group. The team is happy to have climbed the Annapurna peak, but at the same time no expedition is considered successful till you return to your base camp alive. One of the climbers who is a doctor works on Maurice and Lachenal. Lachenal's toes have turned blue but they will recover as they climb down. But Maurice is in bad shape. His fingers are dead and he might loose all of them. The worst was yet to come. The team sets out to return to Camp 4. Little did they know that it was going to be their deadliest night of their life. The weather continues to be worse. The team struggles to spot Camp 4 given its tricky location. The search continues for a while, but then the team gives up and to get a cover from the storm, all of them slip into a ditch just big enough for all four of them. The team spends the entire night in the ditch at freezing temperature. Maurice's condition goes from bad to worse and has actually given up any hope of making it to the base camp alive. Lachenal has got frostbite on his toe and can barely walk. The other two are also in bad shape, but at this point of time they gather all their energy to guide Maurice and Lachenal to Camp 4.

The climbers set out to find out the elusive Camp 4 and realize that they were actually just few yards away from the camp. Due to the storm the visibility was really low and their 'help' shouts were hardly heard. Maurice and Lachenal are again treated at the Camp 4. They are completely snow-blinded. Sherpas have to literally hold their hands and guide them all the way to the base camp. Maurice actually has to be carried on a make-shift chair by a Sherpa. Sherpas while climbing up, struggled on the slippery surfaces and difficult climbs. But they are quick learners and now they manage to get their snow-blinded 'sahibs' back to the base camp safely.
In the book, Maurice elaborates on how the strengths and the weaknesses of the Sherpa community.

Lachenal loses his toe, but Maurice is actually the one who suffers the maximum loss. His fingers has to be amputated. He will never be able to go on a similar expedition. He has to be content with smaller climbs at Charmonix in France, which has been his playground. Maurice is although happy to be alive and to have successfully climbed the highest peak in human history. He has engraved his name in the annals of mountaineering. Back in Nepal, Maurice is presented the highest honorary award by the Nepal King. People back home in France are delighted at the success of their team.

Two years later, Maurice incapable of writing, narrated the experience to his brother and thus came the book "Annapurna". The book has sold around 11 million copies - more than any other book on climbing. But the book also had its share of criticism. Some feel that Maurice has been very pompous in his writing and has not credited his teammates appropriately. Years later, the other team members have published their own account of the expedition. In spite of all the controversy surrounding the book, it remains one of the best books on climbing and provides a lot of inputs on what all goes into the preparation of a mountaineering expedition. Also, the book has been an inspiration to a generation of mountaineers.

I read this book for two reasons, first 'The Himalayas' and second 'Mountaineering'. I have never done any mountaineering, as in with all the gears, so it was difficult to understand all the terms, but still I enjoyed reading the book. The book is not just about the Himalayas and the climbing experience of the mountaineers, but its also about the attitude and mental strength of the individuals that enabled them to overcome all obstacles, to ignore all differences and achieve something that people just dreamed about.

The book ends with an inspiring quote -
"There are other Annapurnas in the lives of men"

Friday, July 24, 2009

व.पु.काळे

व.पु. काळेंच्या पुस्तकामधील काही ओळी... खरं तर पुस्तक वाचताना, आशयाच्या अनुषंगाने येणारया या ओळी अधिक प्रभावी वाटतात.

* प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावानुसार वागत असली तरीसुद्धा त्या वागण्याचा एक अपराधी भाव मनात रेंगाळत असतो. अशा विचारांना एखाद्या प्रतिभावंताचा आविष्कार लाभला तर लग्न झालेल्या मुलीला पहिले तीन-चार दिवस पाठराखीण का हवी असते ते कळतं.

* वरच्या शक्तीला निराकार, निर्गुण म्हणणं यासारखा गुन्हा नाही. आकाश,तारे, पर्वत, नद्या, झरे, पशुपक्षी आणि त्या शक्तीची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणजे चालता-बोलता माणूस. इतक्या सगुण साकारातून तो उतरल्यावर मागे जे उरलं ते निराकार निर्गुण!

* दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. आई, वडील, नवरा, मुलगा, मुलगी, बायको हे सगळे अर्थहीन गोंडस शब्द आहेत. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडुन जातो.

* कोणी चांगल म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याच त्याला पक्क माहीत असलं म्हणजे माणूस निर्भय होतो. त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते.

* दुसरयाची नजर उधार घेऊ नका.स्वतःच्या नजरेतील ताकद ओळखा, त्याचप्रमाणे आपली मतं घाईघाईने मांडायची चूक करू नका अनुभवातून बोला, प्रचिती घ्या. कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होत त्यालाच ज्ञान म्हणतात.

* प्रेम करण्यासाठी आयुष्य हा एक अवतार आहे. आणि प्रेम म्हणजे ज्या व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःच बिंब पहायला मिळेल अशी व्यक्ती मिळवण आणि त्यासाठी स्वतःच्या डोळ्यांच्या काचा स्वच्छ ठेवणं. डोळे म्हणजे अंतःकरण. डोळे म्हणजे त्या विशाल अंतःकरणाच्या खिडक्या समज. कुणीही त्या झरोक्यातून डोकावून पहावं, त्याला तिथ अवकाश दिसाव. आपल्यालाही इथे जागा आहे हे त्याला कळावं. या दृष्टीकोनातून आत बघ.स्वतःला पहा. तुझ आयुष्य तू तुझ्या चौकटीच्या बाहेर पडून जगूच शकणार नाहीस.

* प्रेमाची व्याप्ती प्रचंड आहे. आपलं या जगातल अस्तित्व विनाकारण नाही, हे दुसरयाच्या डोळ्यात पाहिल्यावरच कळत. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ति उरली नाही की आपलं जगणं संपलं. एखाद्याने अचानक आत्महत्या केली की समजावं, तो निष्प्रेम आयुष्य जगू शकत नाही.

* शास्त्रवचनांचा अगोदर अभ्यास करून कधीच आयुष्य जगायच नसतं. प्रत्यक्ष अनुभवातून गेल्या नंतरच शास्त्रात ती उत्तरं आधीच प्रकट झालेली निदर्शनास येतं. उपनिषदासारखे ग्रंथ हे कसोटीचे दगड आहेत. आपल्या सोन्यात तांब किती आहे हे अनुभवातून गेल्यावर त्या कसोटीवर घासून पाहायचं. प्रचितीचा आनंद प्रत्येकाचा स्वयंभू असतो. त्याच्यात बदल संभवत नाही.

* बोलणारया माणसाला जिथे सुरक्षित वाटत त्याला कुटुंब म्हणतात. मतं पटतील, न पटतील. प्रत्येक माणूस स्वयंभू आहे. त्याच्या परीने तो परीपूर्ण आहे. मतभेद त्यामुळेच होतात.त्याला घाबरायच कारण नाही. म्हणून मुस्कटदाबीच राजकारण मी आयुष्यात कधी खेळलो नाही.